भारताला एका अशा ‘आशिया’ ची गरज आहे, ज्यामध्ये एका राष्ट्राचे यश दुस-या राष्ट्राची शक्ती बनून, सामायिक समृद्धी वृध्दींगत करते. या राष्ट्रांमध्ये तसेच या देशात ही वृध्दी अधिक समावेशक असलीच पाहिजे. ही जबाबादारी फक्त राष्ट्रीय सरकारची नसून ही क्षेत्रीय जबाबदारीही आहे. याशिवाय, भारताचा विकास ही आशिया खंडाची एक यशोगाथा ठरेल आणि आपले ‘आशियाई स्वप्न’ एक मोठया सत्यात उतरेल.