एन. चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश
मी अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. पण नरेंद्र मोदीजींसारखा नेता मात्र मी कधीही पाहिलेला नाही. ते विश्रांती न घेता किंवा जराही उसंत न घेता सतत काम करत असताता. मोदीजींनी अनेक अभूतपूर्व सुधारणा घडवून आणल्या आहेत. परिणामी, आज जगभरात भारताला आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. भारत खंबीर आहे आणि भारत प्रगतीशील आहे. 2047 पर्यंत, स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत, भारत जगातील पहिल्या क्रमांकाची महासत्ता म्हणून पुढे येईल. हे केवळ नरेंद्र मोदीजींमुळेच शक्य झाले आहे.