आम्हाला वर्षानुवर्षे एका विशिष्ट प्रकारच्या करप्रणालीची आम्हाला सवय झालेली असते आणि त्यामुळे ती खूप सोयीची वाटते. नवीन गोष्टींसाठी थोडी धास्ती निर्माण होते पण दूरचा विचार केल्यास ते निश्चितपणे लाभदायक ठरते. दीर्घ काळांत त्यामुळे देशाचे एकत्रीकरण होईल, समान करप्रणाली अस्तित्वात येईल, करचुकवेगिरीला तसेच तत्सम घोटाळ्यांना आळा घातला जाईल आणि म्हणुनच ते अर्थव्यवस्थेसाठी खूप लाभदायक ठरेल.