मला वाटते की भारत योग्य मार्गावर आहे. माझ्या मते तो योग्य काम करत आहे, जसे मी म्हणत की ते (पीएम मोदी) सर्व योग्य निर्णय घेत आहेत, ते त्यांच्या देशातील लोकांसाठी अंतराळ क्षेत्राचा वापर करत आहेत आणि तुम्ही असेच करायला पाहिजे. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण मला वाटते की अंतराळ क्षेत्र देशासाठी खूप महत्त्वाचे आहे, देशाचा निश्चित अंतराळ कार्यक्रम असणे ही खूप कठीण गोष्ट आहे आणि लोकांना अंतराळात पाठवणे हा त्यातील सर्वात कठीण भाग आहे. पण भारत आश्चर्यकारक वेगाने त्या ध्येयाकडे जात आहे असे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अभिनंदन! चांद्रयान-3 चे प्रक्षेपण, चंद्रावर उतरणे आणि लवकरच आपण भारत आपला अंतराळवीर पाठवणार असल्याचे पाहणार आहोत. याचा फायदा भारताला होईल असे मला वाटते.