भारत आता जगात अशा-अशा क्रमांकावर, अगदी वरच्या स्थानी आहे; भारताने आता आणखी एक खूप मोठे ध्येय गाठले आहे; भारताने हे केले आणि भारताने ते केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे नरेंद्रने केले आणि त्यासोबतच भारतीय जनतेने केले. मला याचा खूप आनंद आहे आणि मी फक्त इतकेच म्हणेन: अजून, अजून आणि खूप काही. कारण तुमच्या नेतृत्वाखालील या बारा वर्षांत तुम्ही सुधारणा सुरू केल्या, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली, तसेच रोजगार, आरोग्य, कृषी, जनकल्याण, जीवनमान, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या क्षेत्रांत ठोस पावले उचलली.