राजीव कुमार, व्हाइस चेअरमन, डीएस ग्रुप
केंद्रीय अर्थसंकल्प वित्तीय स्थिरता आणि विकास यामध्ये समतोल साधतो, ज्यामुळे भारताची वाटचाल लवचिक आर्थिक भविष्याकडे होत आहे. एफएमसीजी क्षेत्रासाठी, विकसित भारत अजेंडा मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये समन्वय साधून एका महत्त्वाच्या उत्प्रेरकाचे काम करत आहे. शेती क्षेत्रातील विशिष्ट उपक्रम, जसे की कोको उत्पादन, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालनाला दिलेला प्रोत्साहन, ग्रामीण उत्पन्न वाढवण्यासाठी सज्ज आहेत.