नरेंद्रभाईंच्या नेतृत्वशैलीत समावेशकता लगेच दिसून येते. ‘मन की बात’ हा उपक्रम शासनाच्या अवाढव्य यंत्रणेतील एक लहानशी गोष्ट वाटू शकतो, परंतु ती खोलात जाऊन तपशीलवार सांगण्याची गोष्ट आहे. सामान्य नागरिकाशी थेट संवाद साधून, ते त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्या कथा, संघर्ष आणि योगदानाचे आनंदाने कौतुक करतात. यामुळे ते जमिनीशी, अगदी साध्या स्थितीतील लोकांशी जोडलेले राहतात आणि त्यांचा कारभार हा त्यावर योग्य प्रतिसाद देऊन काम करेल हे ते सुनिश्चित करतात.