Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

देश आत्मनिर्भरतेला बळकटी देत असल्याने, युवा प्रणीत तंत्रज्ञान नवोन्मेषाचे पंतप्रधानांनी केले कौतुक


तंत्रज्ञानाची प्रगती आणि देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यामध्ये बजावत असलेल्या मध्यवर्ती भूमिकेबद्दल भारताच्या युवा नवोन्मेषकर्त्यांचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. गेल्या 11 वर्षात नवोन्मेषाचा वापर करण्यासाठी डिजिटल इंडियाने युवा वर्गाला सक्षम केले आहे, ज्यामुळे तंत्रज्ञानसंपन्न केंद्र असे भारताचे स्थान आणखी भक्कम झाले आहे.

गेल्या 11 वर्षांपासून तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर केल्याने भारतातील लोकांना अगणित फायदे मिळाले आहेत, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. सेवांचे वितरण आणि पारदर्शकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

एक्सवरील मायगव्हइंडियाच्या पोस्टला प्रतिसाद देताना मोदी यांनी नमूद केलेः

“भारतातील युवकांच्या बळावर, आपण नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या वापरात लक्षणीय प्रगती करत आहोत. हे बळ आपल्याला आत्मनिर्भर बनवण्याच्या आणि जागतिक तंत्रज्ञानाचे संपन्न केंद्र बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना देखील बळकटी देत आहे.
#11YearsOfDigitalIndia”

“ तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर केल्याने लोकांना अगणित फायदे मिळाले आहेत. सेवा वितरण आणि पारदर्शकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. त्याशिवाय, तंत्रज्ञान हे गरिबातील गरीब लोकांचे जीवन सक्षम करण्याचे साधन बनले आहे.
#11YearsOfDigitalIndia”

***

SushamaK/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai