पीएम्इंडिया
इकॉनॉमिक टाइम्स जागतिक व्यापार परिषदेत येथे देश विदेशातून आलेले पाहुणे, उपस्थित सर्व महानुभाव,
देवी आणि सज्जनहो !
नवीन इंडियाच्या या संकल्पाच्या कालखंडात ‘नवीन अर्थव्यवस्था – नवीन नियम’ या विषयावर मंथन करायला आपण सर्व एकत्र आलो आहोत. प्रश्न हा आहे कि यात नवीन काय आहे ?
इकॉनॉमिक टाइम्स रोजच छापण्यात येतो पेपरचा दर्जा, प्रिंटिंगचा दर्जा रोज तसाच असतो. बॅनरवर आपण जे वृत्तपत्रांचे नाव लिहिता त्याचा फॉन्ट आणि स्टाईल पण सारखीच असते तरीही आम्ही म्हणतो की, रोज नवीन वृत्तपत्र छापण्यात येत. न्यूजपेपर मध्ये छापण्यात येणारी माहिती रोज वेगळी असते हा फरक असून या आधारावरच लोक म्हणतात ताजी खबर आहे नवीन खबर आहे.
मित्रांनो,
पुढील काही महिन्यात आमचे सरकार चार वर्ष पूर्ण करत आहे. देश तोच, लोक तेच, लोकशाही तीच तरीही, एक स्पष्ट बदल देश विदेशात आढळून येत आहे. देशातील आर्थिक आणि सामाजिक माहितीमध्ये आलेल्या या फरकात नवीन भारताचे, नवीन अर्थव्यवस्था आणि नवीन कायदे समाविष्ट आहेत.
आपल्याला आठवत असेल, चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगात जेंव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेची चर्चा व्हायची तेंव्हा म्हटले जायचे की भारतीय अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती आहे. तेंव्हा लोक आम्हाला हसायचे आणि डोळे वर करून म्हणायचे कि हा देश स्वत: डुबेल आणि आम्हालाही डुबवेल. आज फ्राजील फाईव्ह ची नाही तर भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टाची चर्चा होत आहे. आता जग भारताबरोबर खांद्याला खांदा लावून चालण्याला उत्सुक आहे.
मित्रांनो,
भारताचा विकास पूर्ण जगाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहे.
आज आपण कुठलेही मॅक्रो – इकॉनॉमिक पॅरामीटर बघा, मग ते चलनवाढ, चालू लेखा तूट, चालू आर्थिक तूट असो किंवा, जिडीपी वृद्धी , व्याज दार, एफडीआई अंतस्त्रोत असू दे भारत सर्व दूर चांगली कामगिरी करत आहे.
प्रत्येक वर्षी आमच्या सरकारला स्थूल आर्थिक निर्देशांकाना सुधारण्यात यश आले आहे. पण काय हे जुन्या चाली रीतींमध्ये शक्य होतं? नाही .. जुन्या संकल्पनांना धरून हे शक्य नव्हते.
देशात हा बदल या साठी आला कि देशाने एक नवीन कार्य संस्कृती अवलंबिली आहे आणि आपले सामर्थ्य, आपल्या संसाधनांवर विश्वास ठेऊन नवीन भारताच्या संकल्पनेसह भारत पुढे जात आहे.
मागील तीन वर्षात देशाच्या आर्थिक जगताने एक नवीन गोष्ट शिकली आहे. आणि ती म्हणजे स्पर्धा.
जेंव्हा पुढे जाण्याची जिद्द नसेल, सुदृढ स्पर्धा नसेल तर वेग येणार नाही आणि आपण नव्या उंचीवर जाऊन विचार करू शकणार नाही
मित्रांनो, आज भारताच्या या स्पर्धेला पूर्ण जग मुल्यांकित करत आहे. सॅल्यूट देत आहे.
मित्रांनो, जेव्हा मी याआधी आपल्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो, तेव्हा जीएसटी फक्त एक संभावना होती. आज जीएसटी ही वास्तवता आहे. स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठया कर सुधारणा लागु होण्यालासुद्धा आता सात महिने पूर्ण होत आहेत. जीएसटीने देशाला एक सर्वोत्तम कर प्रणाली बहाल केली असून, उत्कृष्ट महसूल पद्धती दिली आहे. या प्रणालीने मालाच्या वेगवान दळणवळणाला प्रोत्साहन दिले असून, वाहतूक मूल्य कमी केले असून, निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, असे वातावरण तयार केले आहे.
मित्रांनो, तुम्हाला हे माहितीच आहे की, आमच्या सरकारला ट्विन बॅलन्स शीटचा वारसा कसा मिळाला? तुम्हाला आधीच्या बँकांची कार्यप्रणाली अवगत आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की, भांडवलवादातील हस्तक्षेप आपल्या अर्थव्यवस्थेत व्यापक वातावरणात कशापद्धतीने प्रवेश करता झाला. याला सुधारण्यासाठी नादारी आणि दिवाळखोरी कोड अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावरची सुधारणा आम्ही केली.
आज देशात 2000 पेक्षा जास्त नादारी व्यवसायिक आणि 62 दिवाळखोरी संस्था निरंतर 24 तास या समस्येला दूर करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. फक्त तीन महिन्यात आमच्या सरकारने 2700 पेक्षा जास्त तक्रारींचा निपटारा केला आहे.
निर्यात हा असाच एक आव्हानात्मक विषय होता. 2015-16च्या आयात-निर्यातीच्या सांख्यिकीचे निरीक्षण केले तर, लक्षात येईल की, दोन्ही क्षेत्रात जवळपास 15 टक्के घट झाली आहे. ही घट का झाली यावर अनेकांचे अनेक अभिप्राय आहेत. अशी एक संभावना आहे, ज्यावर अर्थ नीति तज्ञांनी मंथन करणे आवश्यक आहे.
मित्रांनो, 2014 ला सरकार निवडून आल्यानंतर काळ्यापैशांच्या विरोधातील आमचा निर्णय हा एक मोठा निर्णय होता. एसआयटीची स्थापना करण्यात येऊन त्यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, आयात-निर्यातीत चलन प्रत हा गंभीर विषय आहे. सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्तीची पावले उचललीत. आता हा अर्थतज्ञांसाठी अभ्यासाचा विषय झाला आहे की, व्यापार तुटीविना मोठ्या प्रमाणावर बदल कसे घडून आलेत, असे काय झाले की आयात-निर्यातीत एकाच प्रकारची घट बघायला मिळत होती. यामागे चलन प्रत हे कारण होते की मुळ प्रतीत सुधारणा करणे हे होते, हे तपासायला हवे.
विनीत जी, तुम्ही उद्या हे नका छापू की निर्यातीत घट झाल्याबद्दल मोदींनी सफाई दिली. मी एक दृष्टीकोन तुमच्या समोर ठेवतो आहे, निर्यातीत झालेल्या घटीवर तुम्हा सगळ्यांना विचार करायचा आहे. काही कलावधीनंतर आता निर्यातीत सुधारणा झाली आहे.
मित्रांनो, दुर्मुखलेल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण पाणी उकळायला ठेवतो, तेव्हा एका विशिष्ट तपमानानंतर बाष्प जमायला सुरुवात होते. या तपमानावर पोहोचण्याच्या आधी ना पाणी उकळत, नाही वाफ तयार होते. याच प्रकारे सरकारांच्या प्राथमिकता लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. परंतु यासाठी यानंतर वेग, संवेदना आणि शिस्त आवश्यक आहे.
जेव्हा हा वेग, संवेदना आणि शिस्त यानुसार कामे होतात, तेव्हा यशस्वीता आपोआप दाराशी येते. आमच्या सरकारने अटकणारी-भटकणारी आणि लटकणारी संस्कृती बंद केली असून, यामुळे संपूर्ण पद्धतीत एक नवीन वेग आला आहे.
काय हे परिवर्तन असेच आले? हा बदलही असाच मिळाला? यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची आवश्यकता असते, जी आमच्या सरकारने दाखवली आणि हेच नवीन अर्थव्यवस्थेचे नवीन नियम आहेत.
बंधू भगिनींनो, 2014 मध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही किमान संसाधननांचा वापर यावर आधारीत विकास धोरणे आणि या धोरणांवर आधारीत अंदाज पत्रकावर भर दिला आहे.
ही सारी गुंतवणूक, सरकारच्या योजना अनेक रोजगारांच्या संधी घेऊन येत आहेत. मागील 4 वर्षात आमच्या सरकारने जॉब सेंट्रीक बरोबर पिपल्स सेंट्रीक ग्रोथवर भर दिला आहे. एक अशी अर्थव्यवस्था ज्यामध्ये देशातील गरीबांसाठी वित्तीय आंतर्भुतता असायला हवी आणि जी मध्यम वर्गीय लोकांच्या इच्छेवरही लक्ष देईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
मित्रांनो, आमच्या सरकारचा एकच नारा सबका साथ सबका विकास. सगळ्यांच्या सूचना आणि अनुभवांना गाठीशी धरुन पुढे जाणे हे आम्ही ठरविले आहे.
पहिल्या दिवसापासून आमचे प्रयत्न राहिले आहेत की, प्रशासकीय पद्धतीमध्ये समग्र समावेशकता यायला हवी, मी स्वत: बरेचदा शेतकरी, तरुण, विद्यार्थी, तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चर्चा करीत असतो. आम्ही अशी व्यवस्था बनवली आहे, ज्यामध्ये लोकांचा फिडबॅक आम्हाला सरळ मिळतो. तक्रार निवारणासाठी आमच्या सरकारने खुप प्रयास केले आहेत.
मित्रांनो, बऱ्याच वेळेला सैद्धांतीक उपाय विनाचुक लक्षात येतात, परंतु काही वेळा प्रत्यक्ष समस्या या मुळ रुप धारण करतात, त्यांना अशा वेळेला समजू शकतो, जेव्हा सरकार संवेदनशीलतेसह अनेक बारीक सारीक गोष्टींचीही विचार करते.
जसे अलिकडेच बांबू वनस्पतीबाबत घेण्यात आलेले निर्णय, 100 टक्के युरियाचे निमकोटींग, ग्रुप सी आणि ग्रुप डी यांच्या नोकर भरतीच्या मुलाखती पद्धतीचा खातमा, गॅझेटेड ऑफिसरकडून साक्षांकन करण्याच्या पद्धतीला पूर्णविराम. हे संपूर्ण निर्णय आधीपण घेता येऊ शकत होते, परंतु त्यांच्यामध्ये संवेदनशीलतेची कमी होती. जनतेच्या संलग्नतेत असलेल्या कमतरतेमुळे हे होऊ दिले नाही.
मित्रांनो, आमच्याकडे आरोग्य क्षेत्र हे असे क्षेत्र आहे, जे निकोपतेपासून दूर राहिले आहे. आरोग्याशी निगडीत योजना पूर्वीही होत्या, परंतु आता चांगल्या, आरोग्य काळजीवाहू योजनांसह चांगल्या आरोग्याची हमी सुद्धा आहे.
मित्रांनो, डिजिटल इंडिया मिशनचा आधार आमच्या समाजाला डिजिटली प्रोत्साहित समाजात बदलणे हा आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था ज्ञानाधारीत करण्यावर आमचा भर आहे. 100 कोटी बँक अकाऊंट्स, 100 कोटी आधारकार्ड, 100 कोटी मोबाईल फोन, हे अशी एक इको सिस्टीम बनवेल, ज्यामुळे पुर्ण जग वेगळ्या प्रकाराने दिसेल.
मित्रांनो, एमएसएमई हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, या क्षेत्राला मजबूत करण्यासाठी आम्ही निरंतर काम करीत आहेत. जास्तीत जास्त लघु उद्योगांना औपचारिक क्षेत्रात आणण्यासाठी उच्च कर्ज पाठिंबा भांडवल आणि व्याज अनुदान तसेच नाविन्यतेवर जोर देण्यात येत आहे.
यामध्ये वित्तीय तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर योगदान आहे. एमएसएमई क्षेत्राला वित्तीय अंतर्भूतता मिळावी, या क्षेत्राचा विकास आणि वेगासाठी वित्तीय तंत्रज्ञानाच्या उपयोगाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
मित्रांनो, मी यापूर्वी या कार्यक्रमात जेव्हा आलो होतो, तेव्हा सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी ऊर्जा, सर्वांसाठी स्वच्छ स्वयंपाक गॅस, सर्वांसाठी आरोग्य आणि सर्वांसाठी विमा या गोष्टी सांगितल्या होत्या.
मित्रांनो, आमच्या सरकारच्या निती, निर्णय, नियम या सर्वांचे एकच उद्दिष्ट असते. देशाचा विकास, देशातील गरीबांचा विकास. सबका साथ सबका विकास या मंत्रासह चालतांना आम्ही गरीबांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.
मित्रांनो, यावर्षी अर्थसंकल्पात नवीन अर्थव्यवस्थेशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला. अधिसूचीत उत्पादनांसाठी न्यूनतम समर्थन मूल्य म्हणजेच एमएसपी, ज्याचे लागत मूल्य कमीत कमी अडीच पटीने जास्त घोषित करण्यात आले. या लागत मूल्याद्वारे शेतकऱ्यांद्वारा घेण्यात आलेल्या दुसऱ्या श्रमिकांच्या परिश्रमाचे मूल्य, आपल्या यंत्र सामुग्रीच्या भाड्यांची राशी, मशिनचा खर्च, बियाणांचे मूल्य, सर्व प्रकारच्या खतांचे मूल्य, सिंचनावर करण्यात आलेला खर्च, राज्य सरकारांना दिला गेलेला जमिन महसूल, खेळत्या भांडवलावर देण्यात आलेले व्याज, पट्ट्यावर घेण्यात आलेल्या जमिनीसाठी देण्यात आलेले भाडे आणि अन्य खर्च समाविष्ट आहे. एवढच नाही, तर शेतकऱ्यांद्वारे स्वत:साठी आणि त्यांच्या कुटुंबियांद्वारे देण्यात आलेल्या श्रमाचे मूल्य उत्पादन मूल्यामध्ये जोडण्यात आले आहे.
देशातील परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी जोडणारे हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. जेव्हा की, काही अर्थतज्ञ मूल्यवर्धनाचा संकेत देत आहेत.
मित्रांनो, अशा अर्थशास्त्रज्ञांना हा पण विचार करायला हवा की, आमचे अन्नदाता, आमचे शेतकरी यांच्या प्रती आमच्या जबाबदाऱ्या काय असायला हव्या? मला असे वाटते की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाचे आम्ही समर्थन केले पाहिजे. सरकारने या प्रयत्नांना उत्पन्न स्रोतासाठी चिन्हीत करावे, ज्यामुळे आपला वाटा र्नि:संकोचपणे वाढला जाईल.
मित्रांनो, मागील तीन वर्षात प्रामाणिकपणाने संस्थांत्मक कार्य केले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व व्यवस्थांना पारदर्शी बनविण्यात येत आहे. गळतीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
मी यावेळी देशातील उद्योग जगतातील, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना, प्रत्येक व्यावसायिकाला आग्रहाने सांगू इच्छितो की, देशाची वर्तमान आवश्यकता काय आहे, भविष्यातील गरजा काय आहेत, याचा विचार करुन भविष्यात वागण्याचा प्रयत्न करा.
मी अशीही विनंती करु इच्छितो की, विभिन्न वित्तीय संस्थांमधील नियम आणि तत्व यांचा राखरखाव करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांनी पूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य निभवावे.
मी असे स्पष्ट करु इच्छितो की, हे सरकार आर्थिक विषयाशी संबंधित अनियमिततेविरुद्ध कडक कारवाई करेल. जनतेच्या पैशांचा अनियमित वापर, या पद्धतीला स्वीकार होणार नाही. हाच नवीन अर्थव्यवस्थेच्या नवीन नियमांचा मूलमंत्र आहे.
मित्रांनो, इथे नवीन अर्थव्यवस्थेसंदर्भात चर्चा होत आहे. मी येथे चालणाऱ्या वेगवेगळ्या सत्रांबाबत माहिती मिळवली. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की, देशाच्या अर्थ व्यवस्थेशी संबंधित हा मुद्दा असून, मला असे वाटते की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकदम घेतल्यास देशावर सकारात्मक आर्थिक प्रभाव पडेल. या विषयावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे.
हा विषय फक्त भारतापर्यंत मर्यादित नाही, विदेशी कंपन्यासुद्धा यामुळेच प्रभावित होतात. यामुळेच गुंतवणुकही प्रभावित होते. खुपशा देशांचा निवडणुकीचा वेळ, महिना आणि दिवस ठरविलेला असतो. त्या देशांच्या औद्योगिक विकासावर याचा काय परिणाम होतो, यावरही चर्चा होणे गरजेचे आहे.
भारताचा आर्थिक विकास, भारताचा गुड गव्हर्नरसाठीचे निरंतर प्रयत्न, भारतातील वैश्विक मापदंड मिळवण्यासाठी आयोजिलेले कार्यक्रम आणि निती, जगाच्या बरोबर आर्थिक आणि व्यापारी भागिदारी संबंधातील व्यापक सहमतीसाठी आवश्यक असलेले प्रयत्न, विज्ञान, तंत्रज्ञान, नवीनीकरण केंद्रांमध्ये शाश्वत विकासासाठी देण्यात येणारी प्राथमिकता या सर्व गोष्टी संपूर्ण जग आज समजून घेत आहे आणि यामुळेच भारताकडे आकर्षित होत आहेत.
आधुनिक गुंतवणूक, नवीन जागतिक परिदृश्यात भारत फ्रंटलाईन फोर्स होऊ शकतो. तंत्रज्ञान, नुतनीकरण या प्रकरणांमध्ये जगाचे नेतृत्व करु शकतो.
आमच्या जवळ असे सामर्थ्य आहे, असे संसाधन आहे की, आम्ही न्यू इंडियाचे स्वप्न खरे करुन दाखवू शकू. आमचा विकास केवळ आमचा न राहता तो पूर्ण जगासाठी समृद्धी घेऊन येईल.
चला, आपल्या समक्ष उपस्थित प्रत्येक आव्हानांना संधीमध्ये बदलून आम्ही न्यू इंडियाची निर्मिती करु आणि आपल्या संकल्पांना सिद्ध करु.
पुन्हा एकदा सर्वांना या आयोजनाबद्दल खूप खूप धन्यवाद.
सर्वांना खुप खुप धन्यवाद.
B.Gokhale/D.Rane
चार साल पहले पूरी दुनिया में जब भारत की अर्थव्यवस्था की चर्चा होती थी, तो कहा जाता था Fragile Five। आज Fragile Five की नहीं, भारत के Five Trillion Dollar Economy के लक्ष्य की चर्चा होती है। अब दुनिया भारत के साथ कंधे से कंधा मिलाकर चलना चाहती है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
पिछले तीन-चार वर्षों में भारत ने अपने साथ ही पूरी दुनिया की economic growth को मजबूती दी है।
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
IMF के आंकड़ों के अनुसार, वर्ष 2013 के अंत में भारत का World GDP में Nominal Term में कंट्रीब्यूशन 2.4 प्रतिशत था। हमारी सरकार के लगभग 4 वर्षों में ये बढ़कर 3.1 प्रतिशत हो गया है: PM pic.twitter.com/4nAV0xQfae
आज आप कोई भी Macro-Economic पैरामीटर देख लीजिए, चाहे वो inflation हो, Current Account Deficit हो, Fiscal Deficit हो, GDP Growth हो, Interest rate हो, FDI Inflow हो, भारत सभी में बेहतर Perform कर रहा है: PM
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
Inflation Rate नियंत्रित रहने और High Productivity Growth की वजह से रुपए का Outlook भी बेहतर बना हुआ है। ब्याज दर में एक प्रतिशत से ज्यादा की कमी का लाभ ग्राहकों, हाउसिंग सेक्टर और अन्य उद्योगों को हो रहा है: PM
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
3 वर्ष में देश के Economic World ने एक नई चीज सीखी है, और वो है Competitiveness. जब आगे बढ़ने की होड़ नहीं होगी, जब healthy Competition नहीं होगा, तो फिर न speed आ पाएगी औऱ न ही ऊंचे horizons पर जाकर सोच पाएंगे। आज भारत की इस Competitiveness को पूरी दुनिया validate कर रही है:PM pic.twitter.com/h3MTfS9U2U
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
जब पानी को उबालने के लिए रखते हैं तो एक खास temperature पर पहुंचने के बाद ही steam में transform होता है। उस तापमान पर पहुंचने से पहले ना पानी उबलता है और ना steam बनती है। इसी तरह सरकार के initiatives लोगों तक पहुंचे, इसके लिए Speed, Scale और Sensitivity की आवश्यकता होती है: PM
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
जब Speed , Scale, Sensitivity के साथ काम होता है तो Success भी मिलती है। हमारी सरकार ने अटकाने-भटकाने-लटकाने वाला पहले का कल्चर खत्म कर दिया है। इसकी वजह से पूरे सिस्टम में एक नई तेजी आई है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
पहले की सरकार में जिस स्पीड से रेलवे लाइनों को ब्रॉड गेज में बदला जा रहा था, आज उससे दोगुनी रफ्तार से रेल लाइनों को ब्रॉड गेज में बदला जा रहा है: PM pic.twitter.com/OOF2YR1Jpk
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
Achieving Speed & Scale with Sensitivity. pic.twitter.com/pMFtiRHdtF
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
पिछले चार वर्षों में हमारी सरकार ने देश में Job Centric के साथ ही People Centric Growth पर जोर दिया है। एक ऐसी अर्थव्यवस्था जिसमें देश के गरीबों का financial inclusion भी हो, जो Middle Class की Aspiration का भी ध्यान रखे: PM
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
पहले दिन से हमारी कोशिश रही है कि सिस्टम में Horizontally और Vertically Sensitivity को percolate किया जाए। कई बार जो theoretical solutions बहुत Perfect नजर आते हैं, वही कई Practical Problems का origin बन जाते हैं: PM
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
जैसे bamboo पर हाल में लिया फैसला, यूरिया की 100% नीम कोटिंग , ग्रुप सी और ग्रुप डी की नौकरी में इंटरव्यू खत्म, गजटेड ऑफीसर से Attest कराने की बाध्यता खत्म करने का फैसला, ये कार्य पहले भी किए जा सकते थे, लेकिन Sensitivity की कमी ने जनता से कनेक्ट की कमी ने ऐसा होने नहीं दिया: PM
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
हमारे यहां हेल्थ एक ऐसा सेक्टर रहा है, जो holistic attention से हमेशा दूर रहा। हेल्थ से जुड़ी योजनाएं पहले भी बनीं, लेकिन उनमें भी Sensitivity की कमी रही। हम Good Healthcare के साथ-साथ Good Health भी Insure कर रहे हैं: PM pic.twitter.com/yzn8PiqH7F
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
MSME का ecosystem, हमारी अर्थव्यवस्था की backbone है। इस सेक्टर को मजबूत करने के लिए लगातार काम कर रही है। ज्यादा से ज्यादा लघु उद्योगों को Formal Sector में लाने के लिए Higher Credit Support, Capital और Interest Subsidy और Innovations पर ध्यान दिया जा रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
जब मैं इससे पहले आपके इस आयोजन में आया था तो मैंने Housing for All, Power for All, Clean Cooking for All, Health for All, Insurance for All की बात कही थी: PM @narendramodi pic.twitter.com/1XqH7qa8Z3
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
एक अपील मैं ये भी करना चाहता हूं कि विभिन्न Financial institutions में नियम और नीयत यानि Ethics बनाए रखने का दायित्व जिन्हें दिया गया है वो पूरी निष्ठा से अपना कर्तव्य निभाएं। विशेषकर जिन्हें निगरानी और मॉनीटरिंग की जिम्मेदारी सौंपी गई है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
मैं स्पष्ट करना चाहूंगा कि ये सरकार आर्थिक विषयों से संबंधित अनियमितताओं के विरुद्ध कड़ी कार्रवाई कर रही है, करेगी और करती रहेगी। जनता के पैसे का अनियमित अर्जन, इस सिस्टम को स्वीकार नहीं होगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018
मुझे लगता है कि इस तरह के कार्यक्रमों में लोकसभा और विधानसभा के चुनाव एक साथ कराने पर जो Positive Economic Impact देश पर पड़ेगा, उसकी भी चर्चा होनी चाहिए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 23, 2018