पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राजमुंद्री विमानतळ येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाची 10.25 एकर जमिनीची आंध्र प्रदेश सरकारने दिलेल्या तेवढ्याच जमिनीबरोबर अदलाबदली करायला मंजुरी दिली आहे. राजमुंद्री विमानतळाच्या आसपासच्या गावांना संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी रस्ता बांधण्यासाठी याचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे.
यामुळे सामान्य नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जायला रस्ता उपलब्ध होईल.
N.Sapre/S.Kane/P.Kor