पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केले. त्यांचे हे भाषण 103 मिनिटांचे असून लाल किल्ल्यावरील सर्वात जास्त काळ चाललेले आणि महत्त्वाचे भाषण ठरले. या भाषणात, त्यांनी 2025 पर्यंत विकसित भारतासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. आत्मनिर्भरता, नावीन्यपूर्णता, आणि नागरिकांचे सक्षमीकरण यावर पंतप्रधानांनी भर दिला. एकेकाळी दुसऱ्यांवर अवलंबून असलेला देश, आज जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने भरलेला, तंत्रज्ञानाने प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.
पंतप्रधान मोदी यांनी 2025 च्या विकसित भारताचा दृष्टिकोन मांडताना भारताची प्रगती आत्मनिर्भरता, नावीन्यपूर्णता आणि नागरिकांच्या सक्षमीकरणावर आधारित आहे, असे सांगितले. धोरणात्मक संरक्षण ते सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा ते कृषी, आणि डिजिटल सार्वभौमत्व ते युवा सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये भारताला 2025 पर्यंत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे भारत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, सामाजिकदृष्ट्या समावेशक आणि धोरणात्मकदृष्ट्या स्वायत्त बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
1. सर्वसाधारण
2 संरक्षण मंत्रालय
3 वित्त मंत्रालय
4 गृह मंत्रालय
5. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
6 पशु संवर्धन मंत्रालय
7. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
8 अंतराळ विभाग
9. अणुऊर्जा विभाग
10. कामगार आणि रोजगार मंत्रालय
11. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई)
12. रसायने आणि खते मंत्रालय
13. महिला आणि बाल विकास मंत्रालय
14. कायदा आणि न्याय मंत्रालय
15. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
16. आदिवासी व्यवहार मंत्रालय
17. संस्कृती मंत्रालय
18. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय
19. ऊर्जा मंत्रालय
20. खाण मंत्रालय
21. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
***
सोनल तुपे/शैलेश पाटील/निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai