Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

धैर्य आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


दैव प्रतिकूल असतानाही कधीही धैर्य सोडू नये, कारण संयम आणि चिकाटीच्या जोरावर माणूस गमावलेली स्थिती पुन्हा प्राप्त करू शकतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे समुद्राच्या मधोमध जहाज फुटल्यावरही एखादा कुशल खलाशी आशा सोडत नाही आणि पोहून वाचण्याचा प्रयत्न करत राहतो, त्याचप्रमाणे दृढनिश्चय आणि अथक प्रयत्नांमुळे संकटांवर मात करता येते असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी यावेळी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले –

“त्याज्यं न धैर्यं विधुरेऽपि दैवे धैर्यात्कदाचित्स्थितिमाप्नुयात्सः।

याते समुद्रेऽपि च पोतभङ्गे सांयात्रिको वाञ्छति कर्म एव।। ”

या सुभाषितातून असा संदेश मिळतो की, नशीब प्रतिकूल असतानाही संयम सोडू नये, कारण संयमाच्या बळावर गमावलेली अनुकूल परिस्थिती पुन्हा प्राप्त करता येते. ज्याप्रमाणे एखादा कुशल खलाशी समुद्राच्या मधोमध जहाज फुटल्यावरही खचून न जाता केवळ आपल्या कृतीवर – म्हणजेच वाचण्यासाठी पोहण्याच्या प्रयत्नांवर – लक्ष केंद्रित करतो.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ प्रसार माध्यमावर लिहिले आहे की-

“त्याज्यं न धैर्यं विधुरेऽपि दैवे धैर्यात्कदाचित्स्थितिमाप्नुयात्सः।

याते समुद्रेऽपि च पोतभङ्गे सांयात्रिको वाञ्छति कर्म एव ।।”

***

NehaKulkarni / SandeshNaik / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai