पीएम्इंडिया
[
181KB ]
[
181KB ] ‘स्वच्छ भारत अभियानाची’ जनजागृती करण्यासाठी देशभर सायकल यात्रा करणाऱ्या अभिषेक कुमार शर्माने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ आवाहनाने प्रेरित होऊन लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने शर्मा यांनी देशभर सायकल भ्रमण करत आहेत. या कार्यासाठी ते संपूर्ण वर्ष व्यतीत करणार आहे. शर्मा यांनी आतापर्यंत आठ राज्यातील 5000 गावे आणि 350 शहरांना भेटी दिल्या असून 4500 किमी इतका प्रवास केला आहे. आपल्या भेटीदरम्यान ते तिथल्या लोकांना स्वच्छतेसंदर्भात संवाद साधत आहेत.
शर्मा यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.