पीएम्इंडिया
बांधकाम तसेच इमारत पडझडी दरम्यान निर्माण झालेल्या कचऱ्याच्या पुनर्वापराच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी तसेच या क्षेत्रात मनुष्यबळ विकास क्षमता निर्माण करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खाते आणि नॉर्वेच्या एसआयएनटीइएफ यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मोहोर उठवली.
भारतातल्या बांधकाम व्यवसायात प्रतिवर्षी 10-12 दशलक्ष टन कचऱ्याची निर्मिती होते. यापैकी विटा, धातू यासारख्या वस्तूंचा पुन्हा वापर केला जातो. मात्र कॉक्रीट, दगड यासारख्या मोठया प्रमाणातल्या कचऱ्याचा मात्र भारतात सध्या पुन्हा वापर केला जात नाही.
N.Chitale/M.Desai