Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गेल्या दशकभरात आत्मनिर्भरता आणि नवोन्मेषामुळे भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये झालेले परिवर्तन पंतप्रधानांनी केले अधोरेखित


नवी दिल्‍ली, 17 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दशकभरात भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये झालेले महत्वाचे परिवर्तन अधोरेखित केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोन, आणि नवोन्मेश, तंत्रज्ञान आणि स्वदेशी उत्पादनाची जोड, यामुळे भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, गेल्या 12 वर्षांत संरक्षण क्षेत्रात झालेली प्रगती, ही आत्मनिर्भरतेद्वारे राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यावर भारताचा वाढत असलेला भर दर्शवते.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताने हवाई, तसेच भू-सागरी क्षेत्रात आपली संरक्षण क्षमता बळकट केली आहे, प्रगत स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे, तसेच आत्मनिर्भरता आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अधिक भक्कम पाया उभारला आहे.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:

“आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाने प्रेरित, तसेच नवोन्मेश, तंत्रज्ञान आणि स्वदेशी उत्पादनांच्या बळावर, गेल्या दशकभरात भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये महत्त्वपूर्ण परिवर्तन घडले आहे.

#12YearsOfSurakshitBharat”

 

गेल्या 12 वर्षांत भारताने संरक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीची झलक या थ्रेडमध्ये मिळते:

#12YearsOfSurakshitBharat”

 

* * *

नाना मेश्राम/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai