Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

‘छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. आपण एक आदरणीय व्यक्तिमत्व गमावले आहे ज्यांचे समाजाप्रती योगदान कायम स्मरणात राहील. या दु:खद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दु:खात मी सहभागी आहे. बलरामजी दास टंडन यांनी पंजाबमध्ये शांतता आणि समृद्धी नांदावी यासाठी अनेक दशके व्यतीत केली. उद्योग आणि कामगार कल्याण या क्षेत्रांबाबत त्यांना अधिक आपुलकी होती. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा राज्याला फायदा झाला. आणीबाणीला विरोध करताना त्यांनी दाखवलेले धैर्य कायम स्मरणात राहील,’ असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे,

*****

B.Gokhale/S.Kane/P.Kor