Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जगावर प्रभाव पाडण्यात शौर्य आणि धैर्य यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले


नवी दिल्ली 18 मार्च 2026

धाडसाचे महत्त्व आणि एखादी शूर व्यक्ती संपूर्ण जगावर किती खोलवर परिणाम करू शकते हे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले.

पंतप्रधान म्हणाले की, शौर्य आणि पराक्रम हे असे भांडवल आहे ज्याच्या जोरावर प्रत्येक अडचणीला तोंड देता येऊ शकते. या संदर्भात भारतातील तरुणांचे धाडस आणि आत्मविश्वास अत्यंत प्रेरणादायक आहे याला त्यांनी दुजोरा दिला.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“शौर्य आणि पराक्रम हे असे भांडवल आहे ज्याच्या जोरावर प्रत्येक अडचणीला तोंड देता येऊ शकते. भारतातील तरुणांचे धाडस आणि आत्मविश्वास याचीच प्रेरणा देतात

एकेनापि हि शूरेण पादाक्रान्तं महीतलम्।
क्रियते भास्करेणेव स्फारस्फुरिततेजसा ॥”

ज्याप्रमाणे सूर्याची किरणे त्याच्या तेजस्वी किरणांनी संपूर्ण पृथ्वीला उजळून टाकतात, त्याचप्रमाणे एक शूर व्यक्ती त्याच्या धैर्याने संपूर्ण जगाला प्रभावित करू शकतो.

***

NehaKulkarni / SanjanaChitnis / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai