पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वारणसीला भेट दिली.
वाराणसी इथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचा अर्थात (आय आर आर आय चा) परिसर त्यांनी राष्ट्राला अर्पण केला. संस्थेच्या विविध प्रयोगशाळांनाही यावेळी पंतप्रधानांनी भेट दिली.
दीनदयाळ हस्तकला संकुलात, पंतप्रधानांनी ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ प्रदर्शनाला भेट दिली.
व्यापक निवृत्तीवेतन व्यवस्थापन योजनेचा त्यांनी प्रारंभ केला. वाराणसी इथे त्यांनी विविध प्रकल्पांचे भूमीपूजन तर काही प्रकल्पांचे लोकार्पणही केले.
आज भूमीपूजन करण्यात आलेल्या सर्वच प्रकल्पांमागे एक सामाईक संकल्पना आहे आणि ती म्हणजे ‘जीवन उंचावणे आणि व्यवसाय सुलभता’ असे पंतप्रधान म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारची ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ ही योजना म्हणजे ‘मेक इन इंडिया’चा विस्तार असल्याचे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशमधे लघु आणि मध्यम उद्योग हे पंरपरेचे भाग आहेत. यासंदर्भात त्यांनी भादोई इथल्या गालिचा उद्योगाचा, मेरठ इथल्या क्रीडा साधने उद्योगाचा आणि वारणसी इथल्या रेशीम उद्योगासह इतर उद्योगांचाही उल्लेख केला. वारणसी आणि पूर्वांचल ही हस्तकला आणि कलेची केंद्रे असल्याचे ते म्हणाले. वाराणसी आणि आजुबाजुच्या परिसरातल्या दहा उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. एक जिल्हा, एक उत्पादन योजनेच्या माध्यमातून, उत्तम यंत्रे, प्रशिक्षण आणि विपणन सहाय्याद्वारे या कलांचे फायदेशीर व्यापारात रुपांतर होईल असे पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान 2000 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.
उत्पादन निर्मात्यांना सर्वसमावेशक उपयायोजना पुरवण्यावर या योजनेत भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दीनदयाळ हस्तकला संकूल आपले उद्दिष्ट आता पूर्ण करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि व्यवसाय सुलभेतसाठी केंद्र सरकार काम करत आहे.
आज सुरु करण्यात आलेल्या सिस्टिम फॉर ॲथॉरिटी ॲन्ड मॅनेजमेंट ऑफ पेन्शन, ‘संपन्न’ या यंत्रणेमुळे दूरसंवाद क्षेत्रातल्या निवृत्ती वेतनधारकांना मोठी मदत होणार असून यामुळे निवृत्ती वेतनाचे वेळेवर वितरण होण्यासाठी मदत होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
नागरिक केंद्रीय सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात आणि जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा उपयोग करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. टपाल कार्यालयांद्वारे बँकींग सेवांचा विस्तार करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा उपयोग करण्यात येत आहे. ग्रामीण भागातल्या जनतेला डिजिटल माध्यमातून सेवा पुरविण्यासाठी तीन लाख सामाईक सेवा केंद्रांचे जाळं उपयुक्त ठरत आहे. देशातल्या इंटरनेट जाळ्याची व्यापकता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
देशातल्या एक लाख पंचायत ब्रॉडबॅन्डच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. डिजिटल इंडिया, जनतेचे जीवन सुलभ करण्याबरोबरच सरकारी कामाकाजात पारदर्शकता आणणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीही उपयुक्त ठरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यासंदर्भात त्यांनी सरकारच्या ई बाजारापेठांचा उल्लेख केला. एमएसएमई अर्थात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी या ई बाजारपेठा अतिशय उपयुक्त ठरतील असे पंतप्रधान म्हणाले. एमएसएमईच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. या उद्योगांसाठी पतपुरवठा सुलभ करुन त्याद्वारे व्यवसाय सुलभता आणली जात आहे.
देशाच्या पूर्वेकडच्या भागात एलएनजी द्वारे आधुनिक सुविधा आणि उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. याचा एक फायदा म्हणजे वाराणसीतल्या हजारो घरांना आता स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध झाला आहे.
वाराणसीतल्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था परिसराचा उल्लेख करत, हे केंद्र म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करत शेती अधिक फायदेशीर करण्याच्या आपल्या सरकारच्या प्रयत्नांचा परिपाक आहे.
काशी नगरीचे परिर्वतन आता दृष्टीपथात आहे. यासंदर्भात आज अनावरण करण्यात आलेले विकास प्रकल्प आणखी उपयुक्त ठरतील. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनतेचा पाठिंबा उपयुक्त ठरत आहे.
वाराणसीमध्ये आयोजित होणारा आगामी प्रवासी भारतीय दिन यशस्वी ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
B.Gokhale/N. Chitale/D. Rane
It is a matter of pride for Kashi that this great city is now home to the International Rice Research Institute South Asia Regional Centre. This Centre harnesses the power of technology and innovation for the benefit of our farmers.
— Narendra Modi (@narendramodi) December 29, 2018
Glimpses from the inauguration today. pic.twitter.com/7sSZTLrfSH
हर ज़िले में कुछ अलग है, जिसने यहां लोगों को रोज़गार से जोड़ा है।
— PMO India (@PMOIndia) December 29, 2018
इसको विस्तार देने के लिए एक जनपद, एक उत्पाद लाभकारी सिद्ध होने वाली है।
पूर्वांचल तो हस्तशिल्प का हब है।
कलाकारी चाहे कपड़े और कालीन में हो या फिर मिट्टी या धातू के बर्तनों में, कण-कण में कला बसी हुई है: PM
आज जन्म प्रमाण पत्र से लेकर जीवन प्रमाण पत्र तक सरकार की सैकड़ों सेवाओं का बड़ी तेज़ गति से विस्तार हो रहा है।
— PMO India (@PMOIndia) December 29, 2018
पेंशन जैसी व्यवस्थाओं को भी आसान किया जा रहा है।
घर पर जाकर ही दिव्यांगों, वृद्ध जनों को डिजिटल जीवन प्रमाण पत्र जारी करने का काम चल रहा है: PM
आपने अखबारों में पढ़ा होगा कि देश में 50 करोड़ से अधिक इंटरनेट कनेक्शन काम कर रहे हैं,
— PMO India (@PMOIndia) December 29, 2018
शहरों में तो ये बढ़ोतरी हुई ही है, गांवों में भी तेज़ी से इंटरनेट का दायरा बढ़ा है,
डिजिटल इंडिया से सुविधा तो बढ़ ही रही है, साथ ही ये भ्रष्टाचार को कम करने पारदर्शिता का साधन बन रहा है: PM
पूर्वी भारत में आधुनिक सुविधाएं के लिए बेहतर माहौल बनाने का काम चल रहा है
— PMO India (@PMOIndia) December 29, 2018
प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजना के तहत गैस पाइपलाइन बिछाई जा रही है
इससे घरों की रसोई से लेकर खाद कारखानों तक के लिए गैस मिलनी शुरु हो चुकी है। वाराणसी में रसोई गैस की योजना से हज़ारों घर जुड़ चुके हैं: PM
काशी में परिवर्तन अब दिखने लगा है, दिव्य काशी का स्वरूप अब और भव्य होता जा रहा है।
— PMO India (@PMOIndia) December 29, 2018
आज भी बनारस के विकास से जुड़ी अनेक परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण किया गया है।
ये सारे कार्य काशी की सुंदरता को और निखारने वाले हैं: PM
गंगा की पवित्रता और अविरलता के प्रति हमारी प्रतिबद्धता है।
— PMO India (@PMOIndia) December 29, 2018
मुझे खुशी है कि हमारे प्रयासों के परिणाम भी दिखने लगे हैं।
आप सभी ने मीडिया में आई उन रिपोर्टों को देखा होगा कि कैसे मछलियां, मगरमच्छ समेत अनेक जीव-जंतु जीवनदायनी मां गंगा में फिर से लौटने लगे हैं: PM
हाल में देश के अनेक वैज्ञानिकों की टीम ने गंगाजल के परीक्षण के बाद एक रिपोर्ट भी दी है। इस रिपोर्ट के मुताबिक मां गंगा में प्रदूषण के स्तर में कमी आई है।
— PMO India (@PMOIndia) December 29, 2018
नमामि गंगे का अभियान जैसे-जैसे आगे बढ़ रहा है, वैसे-वैसे निर्मल और अविरल गंगा का लक्ष्य नज़दीक दिख रहा है: PM
जब पूरी पारदर्शिता के साथ, प्रमाणिकता के साथ, जनभागीदारी से सरकार काम करती है, तब सार्थक परिणाम मिलते हैं।
— PMO India (@PMOIndia) December 29, 2018
वरना आप तो साक्षी रहे हैं कि कभी गंगा एक्शन प्लान से लेकर गंगा बेसिन अथॉरिटी तक ना जाने कैसी-कैसी योजनाएं बनाई गईं।
मां गंगा के नाम पर हज़ारों करोड़ रुपए बहा दिए गए: PM
मां गंगा की निर्मलता के लिए धन की शक्ति ही काफी नहीं है, साफ नीयत भी चाहिए।
— PMO India (@PMOIndia) December 29, 2018
हम पूरी ईमानदारी के साथ, साफ नीयत के साथ गंगा जी को स्वच्छ करने के अभियान में जुटे हुए हैं: PM
काशी में होना ही अपने आप में विशेष अनुभूति देता है। यहां के लोगों से मिले प्यार से मैं अभिभूत हूं।
— Narendra Modi (@narendramodi) December 29, 2018
यहां विकास के कई कार्यों का लोकार्पण किया, जो काशी के लोगों के जीवन को और आसान बनाएगा। pic.twitter.com/ZzEpGT1gRG
‘One District, One Product’ is a commendable initiative of the Uttar Pradesh Government, which will safeguard the well-being of all those associated with MSMEs, especially weaving and handicrafts. pic.twitter.com/16mXZx2pkO
— Narendra Modi (@narendramodi) December 29, 2018
Our Digital India initiative has brought convenience in the lives of crores of Indians and has also helped eliminate corruption. pic.twitter.com/uzKY0ydzkC
— Narendra Modi (@narendramodi) December 29, 2018
बाबा विश्वनाथ की असीम कृपा हम सभी पर रही है।
— Narendra Modi (@narendramodi) December 29, 2018
हमारा प्रयास है कि काशी की आत्मा से छेड़छाड़ किए बिना, हमारा ये चिर-पुरातन शहर नई काया के साथ दुनिया के सामने आए। pic.twitter.com/Tl0ftiV8Np