Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सुशासन आणि जनविश्वासावरील एक लेख सामाईक केला


नवी दिल्‍ली, 22 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांनी लिहिलेला एक लेख सामाईक केला आहे.

या लेखात जनतेचा विश्वास हेच सुशासनाचे मोठे भांडवल असल्याचे म्हटले आहे.  गेल्या 12 वर्षांत झालेल्या परिवर्तनाने   शासन आणि प्रशासनावरील लोकांचा विश्वास दृढ करण्याबरोबरच विविध कल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक बनवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या लेखात या  विकासकामांचा लोकांच्या जीवनावर पडलेला प्रभावही विशद करण्यात आला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे:

जन विश्वास हे सुशासनाचे सर्वात मोठे भांडवल आहे. गेल्या बारा वर्षात झालेल्या बदलांनी, प्रशासनाबद्दल लोकांच्या मनातील विश्वास दृढ करण्याबरोबरच विविध लोकहितांच्या योजनांमुळे कोट्यावधी नागरिकांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याच संदर्भात केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांनी या लेखात आपले विचार सविस्तर मांडले आहेत.

 

* * *

निलिमा चितळे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai