पीएम्इंडिया
बाह्य अंतरिक्षाच्या शांततापूर्ण वापरासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली. एप्रिल 2017 मधे या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.
या सामंजस्य करारामुळे अंतराळ विज्ञान, दूरसंवेदक, उपग्रह दळणवळण, अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग या क्षेत्रात सहकार्य सुलभ होणार आहे.
N.Sapre/N.Chitale/D.Rane