पीएम्इंडिया

फेब्रुवारी 2018 मध्ये घोषित केलेल्या उत्तर प्रदेश संरक्षण उद्योग मार्गिकेच्या सोयीसाठी बांधल्या जाणाऱ्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाची कोनशिला चित्रकूट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बसवण्यात आली. 296 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग बनवण्यासाठी 14 हजार 849 कोटी रुपयांचा खर्च होणार असून यामुळे चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औराईया आणि इटावा जिल्ह्यांना याचा फायदा होईल. याच समारंभात आज पंतप्रधानांनी देशभरातल्या 10 हजार शेतकरी उत्पादक संस्थांचा प्रारंभ केला. प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डाच्या वितरणालाही पंतप्रधानांच्या हस्ते सुरूवात झाली.
बुंदेलखंड महामार्ग, पूर्वांचल महामार्ग आणि प्रस्तावित गंगा महामार्गामुळे केवळ अनेक शहरे एकमेकांना जोडली जातील. इतकेच नव्हे तर रोजगाराच्या संधी वाढतील, तसेच शहरात उपलब्ध सेवा सुविधांचा लाभ अधिकाधिक लोकांना घेता येईल, असे पंतप्रधान म्हणाले.
देशाच्या संरक्षणासाठी केवळ जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचीच नव्हे, तर लढाऊ विमाने, पाणबुड्या, जहाजे, हेलिकॉप्टर्स तसेच त्यासंदर्भातील शस्त्रास्त्रे आणि वेध घेणाऱ्या उपकरणांची गरज आहे. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक मार्गिकेत याच गोष्टींचे उत्पादन होणार असून त्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात 3700 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे पंतप्रधान म्हणाले. बुंदेलखंड महामार्गामुळे या संरक्षण मार्गिकेला मोठी मदत होईल असे ते म्हणाले.
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांनी 10 हजार शेतकरी उत्पादक संस्थांचा प्रारंभ केला. या संस्थांमार्फत शेतकरी आणि स्वत: उत्पादित केलेल्या शेतमालाचा व्यापारही करता येऊ शकेल. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने किमान आधारभूत किंमत निश्चिती, मृदा आरोग्य अहवाल, युरिया या कडुनिंबाचे लेपन याबरोबरच अनेक अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प देखील पूर्ण केले आहेत.
शेतमालाला सर्वोत्तम भाव मिळावा म्हणून या शेतकरी उत्पादक संस्था काम करतील. देशभरातल्या 100 प्रगतीशील जिल्ह्यांमध्ये सरकार खास प्रोत्साहन देणार आहे. या प्रगतीशील जिल्ह्यांमध्ये प्रत्येक गटात किमान एक शेतकरी उत्पादक संस्था कार्यरत असणे आवश्यक आहे.
यापूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या होत्या परंतु शेतकऱ्यांच्या खिशात काहीच पडले नाही. त्या तुलनेत आताच्या सरकारने उत्तर प्रदेशातल्या दोन कोटींहून जास्त शेतकरी कुटुंबांना 12 हजार कोटी रुपयांच्या अनुदानाचे थेट बँक खात्यात वितरण केले आहे. यामुळे कोणत्याही भेदभावाला किंवा दलालांना थारा मिळाला नाही, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा योजनेशी जोडले जात असून शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात दोन लाखांपर्यंतची विमा रक्कम त्यांना मिळू शकेल, असे पंतप्रधान म्हणाले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक 16 कलमी कार्यक्रम तयार केल्याची घोषणा यावेळी पंतप्रधानांनी केली. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांपासून अगदी जवळ ग्रामीण बाजाराची योजना असून तिथून शेतकऱ्यांना आपला शेतमाल देशात कुठेही विकता येईल. भविष्यकाळात कृषी अर्थव्यवस्थेची नवीन केंद्रे म्हणून हे ग्रामीण बाजार उदयाला येतील, असेही पंतप्रधान म्हणाले.
B.Gokhale/U.Raikar/P.Kor
बुंदेलखंड को विकास के एक्सप्रेसवे पर ले जाने वाला, 'बुंदेलखंड एक्सप्रेसवे' इस पूरे क्षेत्र के जनजीवन को बदलने वाला सिद्ध होगा। pic.twitter.com/NKBYWK0UVT
— Narendra Modi (@narendramodi) February 29, 2020
हमारे देश में किसानों से जुड़ी जो नीतियां थीं, उन्हें हमारी सरकार ने निरंतर नई दिशा दी है... pic.twitter.com/T0JO8IF301
— Narendra Modi (@narendramodi) February 29, 2020
हाल ही में किसानों के कल्याण के लिए कई महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं। pic.twitter.com/PP5BOBI2Jn
— Narendra Modi (@narendramodi) February 29, 2020
समूह से शक्ति मिलती है और इसी सामूहिक शक्ति से किसान भी समृद्धि की ओर अग्रसर होंगे। किसानों को उचित दाम दिलाने के लिए अब किसानों की सामूहिक ताकत का उपयोग किया जाएगा। pic.twitter.com/9mLH0gea2k
— Narendra Modi (@narendramodi) February 29, 2020
करीब 15 हज़ार करोड़ रुपए की लागत से बनने वाला ये बुंदेलखंड एक्सप्रेस-वे यहां रोज़गार के हजारों अवसर तैयार करेगा और यहां के सामान्य जन को बड़े-बड़े शहरों जैसी सुविधा से जोड़ेगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 29, 2020
थोड़ी देर पहले ही यहां देश के किसानों की आय बढ़ाने के लिए, किसानों को सशक्त करने के लिए 10 हज़ार FPO यानि किसान उत्पादक संगठन बनाने की योजना भी लॉन्च की गई है।
— PMO India (@PMOIndia) February 29, 2020
यानि किसान अब तक उत्पादक तो था ही, अब वो FPO के माध्यम से व्यापार भी करेगा: PM @narendramodi
चित्रकूट सहित पूरे यूपी के 2 करोड़ से ज्यादा किसान परिवारों के खाते में भी करीब 12 हज़ार करोड़ रुपए जमा हुए हैं।
— PMO India (@PMOIndia) February 29, 2020
आप कल्पना कर सकते हैं, 12 हज़ार करोड रुपए, सिर्फ एक वर्ष में। वो भी सीधे बैंक खाते में, बिना बिचौलिए के, बिना किसी भेदभाव के: PM @narendramodi
जो साथी पीएम किसान योजना के लाभार्थी हैं, उनको पीएम जीवन ज्योति बीमा और पीएम जीवन सुरक्षा बीमा योजना से भी जोड़ा जा रहा है।
— PMO India (@PMOIndia) February 29, 2020
इससे किसान साथियों को मुश्किल समय में 2 लाख रुपए तक की बीमा राशि सुनिश्चित हो जाएगी: PM @narendramodi
समूह से शक्ति मिलती है और इसी सामूहिक शक्ति से किसान भी समृद्धि की ओर अग्रसर होंगे। किसानों को उचित दाम दिलाने के लिए अब किसानों की सामूहिक ताकत का उपयोग किया जाएगा।
— PMO India (@PMOIndia) February 29, 2020
आज चित्रकूट में जो नए FPO की शुरुआत हुई है, उसके पीछे भी यही भावना है: PM @narendramodi
सरकार ने ये भी तय किया है कि आदिवासी क्षेत्रों और चित्रकूट जैसे देश के 100 से ज्यादा Aspirational Districts- 'आकांक्षी जिलों' में FPOs को अधिक प्रोत्साहन दिया जाए, हर ब्लॉक में कम से कम एक FPO का गठन जरूर किया जाए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 29, 2020
बुंदेलखंड एक्सप्रेस-वे हो, पूर्वांचल एक्सप्रेस-वे हो या फिर प्रस्तावित गंगा एक्सप्रेस-वे, ये यूपी में कनेक्टिविटी तो बढ़ाएंगे ही, रोज़गार के भी अनेक अवसर तैयार करने वाले हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 29, 2020
इस साल के बजट में यूपी डिफेंस कॉरिडोर के लिए 3700 करोड़ रुपए का प्रावधान किया गया है।
— PMO India (@PMOIndia) February 29, 2020
इन दोनों योजनाओं का आपस में गहरा नाता है। बुंदेलखंड एक्सप्रेसवे से यूपी डिफेंस कॉरिडोर को भी गति मिलने वाली है: PM @narendramodi