पीएम्इंडिया
भारत आणि बांग्लादेश दरम्यान माहिती तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सहकार्य वाढावे यादृष्टीने करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
एप्रिल 2017 मध्ये दोन्ही देशांच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयादरम्यान हा करार करण्यात आला होता. हा करार पाच वर्षे अस्त्विात असेल. त्यानंतर गरज पडल्यास दोन्ही देशाच्या समितीने त्याला मुदतवाढ दिली जाईल.
या कराराचा मुख्य उद्देश ई-प्रशासन अधिक कार्यक्षम करणे हा असून त्याअंतर्गंत सर्व सार्वजनिक सेवा इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करण्यावर काम केले जाईल.
B.Gokhale/R.Aghor/Anagha