Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत – इटली तंत्रज्ञान परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन

भारत – इटली तंत्रज्ञान परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे भारत – इटली तंत्रज्ञान परिषदेला संबोधित केले. यावेळी इटलीचे पंतप्रधान ज्युसेपे कॉन्टे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी भारत-इटली औद्योगिक संशोधन आणि विकास महामंडळ कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमामुळे आपल्या उद्योग आणि संशोधन संस्थांना त्यांची नवीन उत्पादने विकसित करण्यास वाव मिळेल.

तंत्रज्ञानाचे महत्व विशद करतांना पंतप्रधान म्हणाले की,भारताने सामाजिक न्याय, सशक्तीकरण, समावेश आणि पारदर्शकता यासाठी तंत्रज्ञानाला एक माध्यम बनविले असून ,सेवांच्या शेवटच्या मालाचे वितरण प्रभावी करण्यासाठी सरकार या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी सांगितले की सरकार नागरिकांच्या शास्त्रीय प्रवृत्तीना प्रोत्साहन देतांना तांत्रिक प्रवृतींना पाठिंबा देत आहे आणि त्यांच्या विकासावर जोर देत आहे. या संदर्भात, श्री मोदी यांनी अटल इनोव्हेशन मिशन, उमंग ऍप आणि देशभरात पसरलेल्या तीन लाख कॉमन सर्व्हिस सेंटर्स विषयी सांगितले. ते म्हणाले की, या तंत्रज्ञानात्मक उपायांमुळे विविध सुविधा नागरिकांच्या दाराशी पोहचण्यास मदत झाली आहे.

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की , हे नवीनतम आणि दर्जात्मकता याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी पुढे सांगितले की, इटलीसह अन्य देशांना अंतराळ उपग्रह पाठविण्यास भारत सक्षम झाला असून, यामुळे कमी किमतीच्या नवीनतम उपायांची निर्मिती भारत करू शकेल. लाइफ स्टाईल अॅक्सेसरीज डिझाइन (एलएडी) क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातील वाढीव सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. चामडे, दळणवळण आणि ऑटोमोबाईल डिझाइन (टीएडी) साठी विशेष लक्ष देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

******

B.Gokhale