Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या दुःखद दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्यांच्याप्रति पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली. स्थानिक प्रशासन पीडितांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे, असेही ते म्हणाले.

या दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) 2 लाख रुपये तर आणि जखमींना 50,000 रुपये  दिले जातील, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बोट उलटल्याने झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. या दुःखद दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्यांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकराल लवकर सुधारणा होऊ देत अशी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे.

मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai