Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

25 जानेवारी 2018 च्या भारत- आसियान स्मृती परिषदेच्या , पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांचे उदघाटनप्रसंगी केलेले वक्तव्य


महामहिम पंतप्रधान ली सिएन लूंग,

इतर सर्व मान्यवर,

आसियान – भारत स्मृती परिषदेच्या उद्दघाटन प्रसंगी आपले स्वागत करतांना मला आनंद  होत   आहे. आपण आपल्या भागीदारीची २५ वर्षं पूर्ण केली आहेत. आपल्या सहसंबंधांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे.

पाच वर्षांत भारताला दुसऱ्यांदा आशियान परिषदेचे यजमानपद स्वीकारण्याचे भाग्य लाभले.     

उद्या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्ही आमचे सन्मानित पाहुणे असाल. या आनंददायी उत्सवात आमच्या सर्व आसियान सदस्य भागीदारांतर्फे उपस्थित असलेल्या  माझ्या भावांची, बहिणींची उपस्थिती अभूतपूर्व आहे.

आज येथे आपल्या सामूहिक उपस्थितीने माझ्या 1.25 अब्ज सहकारी भारतीय ह्रदयाला स्पर्श केला आहे.

भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीच्या केंद्रस्थानी आसियानला ठेवून आमच्या धोरणात्मक भागीदारीचे महत्व आपण अधोरेखित केले आहे. आमच्या सांस्कृतिक आणि सभ्यता संबंधाने आमची मैत्री झाली आहे. रामायण, प्राचीन भारतीय महाकाव्य, आशियान आणि भारतीय उपमहाद्वीप यामध्ये एक बहुमूल्य सहभागित वारसा आहे

आम्ही या महाकाव्याच्या  माध्यमातून सामान्य सांस्कृतिक खजिना प्रदर्शित  करण्यासाठी, आसियान देशांतील  महोत्सव मंडळांद्वारे  रामायण महोत्सवाचे आयोजन केले आहे.

बौद्ध धर्मासह इतर प्रमुख  धर्माशी   देखील  आम्ही  सांगड घातली  आहे. इस्लाम, दक्षिण पूर्व आशियातील  बऱ्याच  भागांमध्ये भारतीयांशी संलग्नता काही शतकांपासून चालत आली आहे. 

आम्ही संयुक्तपणे आमच्या एकत्रित वारसाचे स्मृती चिन्ह प्रकाशित करीत आहोत.

महामहीम,

हि परिषद म्हणजे आपल्या वर्षभरातील  संयुक्तपणे भारत  आणि आसियान  देशात राबविलेल्या   कृतिकार्यक्रमाची सांगता आहे याद्वारे आम्हाला आपल्या संयुक्त प्रवासाचे पुनरावलोकन करण्याची आणि भविष्यातील मार्गांची छाननी करण्याची एक मौल्यवान संधी मिळते.

माझ्या मते, या उद्देशाने आमच्यात विनामूल्य आणि मैत्रीपूर्ण चर्चेद्वारे सर्वोत्तम सेवा दिली जाते.

महोदय,

1992 पासून, आमच्या   भागीदारी मध्ये  क्षेत्रीय संवादा  पासून  धोरणात्मक  भागीदारी चा  समावेश झाला आहे. आज, वार्षिक शिखर सभांच्या बैठकीत आमच्याकडे तीस क्षेत्रीय संवाद यंत्रणा आणि सात मंत्रिस्तरीय पातळीवरील संवाद आहेत.

पाच वर्षांच्या कारवाईच्या कृतीद्वारे  मी  शांती, प्रगती आणि सामायिक समृद्धीसाठी आशियान-भारत भागीदारीचे उद्दिष्टे अंमलात आणण्यासाठी उत्कृष्ट प्रगती केली आहे.

2016-2020 या कालावधीसाठी आपल्या तिसऱ्या  कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यातील प्रगती प्रशंसनीय आहे

एशियान-इंडिया कोऑपरेशन फंड, आशियान-इंडिया ग्रीन फंड आणि आशियान-इंडिया सायन्स अँड टेक्नोलॉजी फंड यांच्याद्वारे क्षमता निर्माण प्रकल्प हाती घेतले आहेत

महोदय,   महामहीमजी,

  भारताने, महासागर आणि महासागरिय नियमनाद्वारे  आशियाई  देशांना  शांतता आणि समृद्धीचे दर्शन  घडविले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे, विशेषतः यूएनसीएलओएस याकरिता  हा दृष्टिकोन महत्वाचा आहे.

आमच्या सामुदायिक समुद्री क्षेत्रामध्ये व्यावहारिक सहकार्य आणि सहकार्य वाढविण्यासाठी आम्ही आसियान बरोबर काम करण्यासाठी समर्पित आहोत.

पुनर्रकृती सत्रात, आम्हाला  समुद्रीय क्षेत्रामध्ये आसियान- भारत  सहकार्या द्वारे इंडो- पॅसिफिक  वृद्धी आणि विकास यावर चर्चा करण्याची संधी मिळाली. 

खरोखर,  सागरी  सहकार्य हे   स्मृती क्रिया कलापां च्या कार्यातील  एक अविभाज्य भाग  असून,   आशियान इंडिया कनेक्टिव्हिटी  परिषदेमध्ये, निल – अर्थव्यवस्थेच्या  कार्यशाळेत तसेच नियमितपणे संवाद  साधण्यात  आला  आहे.

मानवतावादी आणि आपत्ती निवारण प्रयत्न, सुरक्षा सहकार्य आणि नेव्हिगेशनचे   स्वातंत्र्य आमच्या सागरी सहकार्यासाठी महत्वपूर्ण केंद्र असेल.

संलग्नता  परिषद  ही भारत-आशियाला , जमीन, वायु, समुद्र, सांस्कृतिक, संस्कृती आणि लोकांमधील  परस्परसंबंधांद्वारे  शतकांपूर्वी जोडण्यात आली होती .

  महोदय, महामहिम

माहिती आणि संदेशवहन तंत्रज्ञान  आपल्यामध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटीचे नवीन बंध तयार करेल.

यामध्ये क्षेत्रीय उच्च-क्षमता असलेल्या फाइबर ऑप्टिक नेटवर्क सहकार्या मध्ये   नवीन क्षेत्र आणि दूरगामी भागांशी डिजिटल कनेक्ट करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्कचा समावेश असू शकतो.

भारत ग्रामीण कनेक्टिव्हिटीवर एक पायलट प्रोजेक्ट  देणार असून,  जो  कंबोडिया, लाओ पीडीआर, म्यानमार आणि व्हिएतनाम मधील डिजिटल  गावे तयार करेल. या प्रकल्पाची यशस्वीता इतर आशियान देशांमध्ये  केली  जाऊ  शकते.

आम्ही आशियाई देशांतील माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान व्यावसायिकांसाठी धोरण, विनियमन आणि तांत्रिक विकासातील सर्वोत्तम पद्धतींचे सादरीकरण करण्यासाठी दूरसंचार आणि नेटवर्किंग तंत्रज्ञानावर एक प्रशिक्षण कार्यक्रम देखील  देण्याचे   ठरविले  आहे . 

आर्थिक बाबींमध्ये आपली समज आणि सहकार्य वाढविण्यासाठी, मी डिजिटल आर्थिक समावेशन आणि गुंतवणुकीचे प्रबोधन आणि पायाभूत सुविधांवर एक संवाद मांडतो.

संयुक्त आर्थिक दहशतवादाचा सामना करणे हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे जेथे आम्ही एकत्रितपणे काम करू शकतो.

महामहिम, महानविकास,

आमच्या 70 अब्ज डॉलर्सचा  व्यापार 25 वर्षां मध्ये  25 पटींनी वाढला  आहे. आशियान आणि भारतातील गुंतवणूक मजबूत आणि वृद्धिदर्शक  आहे.

आम्ही आमचे व्यापार संबंध अधिक सुधारण्यासाठी आसियान बरोबर कार्यरत राहणार आहोत  यामुळे आमच्या व्यावसायिक समुदायात आपापसात संवाद साधण्याची सोय होईल.

व्यापार आणि गुंतवणूक बैठक आणि प्रदर्शनासह अलीकडील  गुंतवणुकीतले  यश, आशियान इंडिया बिझनेस कौन्सिल मीटिंग, बिझनेट कॉन्फरन्स, स्टार्ट-अप फेस्टिवल आणि हॅथॉन आणि आयसीटी एक्स्पो यांनी उत्साहवर्धक परिणाम दर्शविले  आहेत.

आम्हाला आशा आहे की,  आमचा  प्रकल्प विकास निधी द्वारे प्रादेशिक मूल्य श्रृंखलांमध्ये एकत्रित होण्यास मदत करतील, विशेषत: वस्त्रोद्योग आणि वस्त्रे, फार्मास्युटिकल्स एग्रो-प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि  त्वरित  परिणाम देतील  .

महोदय  , महानविकास,

लोकालोकांमधील परस्पर संबंध हा आमचा शेकडो वर्षांचा दुवा आहे.

दक्षिणपूर्व आशियात भारतीय वंशाचे लोक  दूरगामी परिस्थितीत स्थायिक झाले  आहेत. स्थानिक समाजात त्यांना अतिशय आदराने  वागविले जाते. या महिन्याच्या सुरुवातीला, सिंगापूरमधील आसियान-भारत प्रवासी भारतीय दिवसाने  आपल्यातील जवळच्या नातेसंबंधास हातभार लावला.

संसदेच्या सदस्यांची  परिषद   आणि भारतीय वारसासह महापौरांची  पहिली  परिषद, नवी दिल्लीत एकाच वेळी आयोजित करण्यात आली  होती , तेव्हा आसियान देशांमधून मोठ्या प्रमाणावर  प्रतिनिधी  उपस्थित  होते.

आमच्या ऐतिहासिक  संबंधांना बांधण्यासाठी, मी प्रस्ताव मांडतो की, 2017  हे वर्ष  आसियान-भारत पर्यटन वर्ष म्हणून घोषित करु . आम्ही पर्यटनाला चालना देण्यासाठी मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा मंडळे स्थापन करू शकू. आमच्या क्षेत्रातील पर्यटक आणि यात्रेकरूंना आकर्षित करण्यासाठी बौद्ध पर्यटन परिसर हा एक महत्त्वाचा भाग यामध्ये  असू शकतो.

महोदय , महानविकास,

भारताने जीर्णोद्धार कार्यात ऐतिहासिक वास्तूमध्ये सहभाग घेतला आहे जो आपल्या कायमस्वरूपी सभ्यतावादी बंधांना मान्यता देतो.

कंबोडिया, म्यानमार, लाओ पीडीआर आणि व्हिएतनाममधील मंदिरातील  जीर्णोद्धार  संवर्धनाच्या कामात भारत भूमिका निभावला.

आसियान –  भारत   संग्रहालयांच्या  नेटवर्क चे  ज्ञान पोर्टल या सामायिक वारसाला मदत करू शकतात.

आमच्या स्मारक घटनांचा एक महत्वाचा  प्रकाशझोत  आपल्या युवकांच्या  शक्ती, व भविष्यावर केंद्रित होतो.

युवक परिषद ,  कलाकारांचे राहण्याचे ठिकाण, संगीत महोत्सव, आणि आमच्या युवकांमध्ये डिजिटल कॉमर्ससाठी स्टार्ट अप फेस्टिव्हल हे यामागे आहे. 24 तारखेला युवा पुरस्कार देऊन आम्ही त्यांच्या भावनांना प्रोत्साहन दिले आहे.

आमच्या क्षेत्रातील युवाशक्तींना अधिक सक्षम करण्यासाठी, भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये एकत्रित पीएच्.डी. अभ्यासक्रमांचा  समावेश  करण्यात  आला  असून , १०००  शिष्यवृत्ती आशियाई देशांतील विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना  घोषित  करण्याने   मला आनंद  झाला आहे.

आम्ही आसियान महामार्ग व्यावसायिकांसाठी इंडियन  अकादमी ऑफ हायवे इंजिनियर्स येथे समर्पित प्रशिक्षण अभ्यासक्रम देऊ इच्छितो.

मी असेही प्रस्तावित करतो की आम्ही आंतरविद्यापीठ  देवाणघेवाण  अधिक प्रोत्साहित करण्यासाठी विद्यापीठ नेटवर्क ची  स्थापन करायला हवी.

B.Gokhale/