पीएम्इंडिया
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. नेताजींचे शौर्य, धैर्य आणि देशभक्ती आपल्याला प्रेरणा देते. त्यांची संघटना आणि नेतृत्वगुण अतुलनीय होते. त्यांचे व्यक्तिमत्व लोकोत्तर होते आणि राष्ट्रहित त्यांच्यासाठी सर्वोच्च होते, अशा शब्दात पंतप्रधानांनी नेताजींना आदरांजली वाहिली आहे.