Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी बिहारमधील कटिहार येथील अपघातात मृत्यू झालेल्यांप्रति  शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कटिहार येथे झालेल्या दुर्दैवी अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे नमूद केले.
पंतप्रधानांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी  प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले:
“बिहारमधील कटिहार येथील अपघात अत्यंत वेदनादायक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना.
मृतांच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफमधून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.”

***

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai