Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवी आचरणाला सुव्यवस्थित मानदंडांनी मार्गदर्शन करण्यावर भर देणारे एक संस्कृत सुभाषित केले सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य आचरणाचे महत्त्व विशद करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून योग्य आचरण हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहे जे केवळ एका व्यक्तीचेच आयुष्य नव्हे तर संपूर्ण समाज उजळवून टाकते, असे म्हटले आहे. याच आदर्शांना अंगीकारून आपल्या देशातील लोक संपूर्ण संयम, सामर्थ्य आणि कर्तव्यनिष्ठेने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी झाले आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:

सदाचार हा एक दीप आहे जो केवळ व्यक्तीलाच नव्हे तर समाजालाही प्रकाशित करतो. हा आदर्श स्वीकारून, आपले देशवासी आज पूर्ण संयम, सामर्थ्य आणि समर्पणाने राष्ट्रउभारणीच्या कार्यात गुंतले आहेत.

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ।

ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि।।”

काय करावे आणि काय करु नये याबद्दलचा निर्णय हा व्यक्तिनिष्ठ मतांवर किंवा क्षणिक मोहावर अवलंबून असता कामा नये तर तो शास्त्रांमध्ये दिलेल्या सुव्यवस्थित मानदंडानुसार असावा ज्यामुळे आचरणाला दिशा आणि शिस्त लागते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने स्थापित मूल्यव्यवस्थेनुसार आचरण केले पाहिजे ज्यामुळे त्याचे आचरण संतुलित, प्रमाणित आणि अर्थपूर्ण असेल.

***

NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai